2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जिवण उत्कट आहे आणि ध्येयाकडे जायच्या वाटाही अगणित आहेत. त्यामुळे कधी एखादा ठरवलेला मार्ग काही कारणास्तव बंद झालाच तर निरास होऊन त्याची पाटी गिरवत बसण्यात अर्थ राहत नाही. नाउमेद माणसाकडून त्याच्यातली बरीच क्षमता काढून घेते, त्यामुळे संयम बाळगत नव्या दृष्टीकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे.
किमान चारदोन निवडीची लोकं सोबत असावीतच कायमसाठी. कारण अंधारात, एकट्याच्या संघर्षात कुणी नसल्याची उणीव फारशी पोकळी मनाला जावणत नाही पण जेव्हा विजयात कुणीच सामिल नसतं, तेव्हा प्रचंड त्रास होतो. कारण मानवाला मुळ स्वभावत:च एखादी तरी संगत गरजेची असते, मानव हा एकलकोंडा स्वभावाचा नसतो.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.
शारिरीक क्षमता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण प्रत्येक माणसाच्या अंतर्गत शरिरात जो मेंदू असतो तो फार मोठ्या प्रमाणावर युक्तीचा/बुद्धीचा स्त्रोत असतो. मेंदूला जितक्या प्रमाणात तुम्ही रोज माहिती आणि ज्ञानाचा खुराक खाऊ घालालं तितकाच तो बलाढ्य होत जात असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अंतर्गत क्षमतांच्या आधारे कोणताही पण आपल्याला जिंकता येईल इतकं स्वत:ला सक्षम आणि प्रभावी बनवलं पाहिजे.
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.