देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं सुचत नाही आणि घेताना एवढं घेतो की जगावं की मरावं कळत नाही.

जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.

एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.

मी एकटा आहे एकाकी नाही.

जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.

खूप ऐकत केलं मला माझ्याच लोकांनी समजत नाही नशीब वाईट आहे की मी.

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं.

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.

एकटे राहण्याने तुम्ही घाबरू शकता पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.

संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.