कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.

कोणाला चुकीचं समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घ्या.

बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.

काही गोष्टी समजण्यासाठी हृदय असावं लागतं तेही तुटलेलं.

जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.

जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.

आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.

माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.

खुप विश्वास होता काही लोकांवर पण इतक्या लवकर बदलतील वाटल नव्हतं.

खिशाला थोडं छिद्र काय पडलं पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.

जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.