आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.
तुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.
तुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील.