इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.
आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.
आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..