आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.
अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.
मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.
अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.
मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.