जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.