जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.
प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.
प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.