जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.
विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
यशासाठी एकेक पायरी महत्वाची असते याचा अर्थ असा की तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारं छोट्यातलं छोटं ज्ञान/कोशल्य देखील महत्वाचं असतं. हे अगदीच सोप्पंय, मी सहज करून देईन हा अॅटिट्युड तिथे बाजुला ठेवून प्रत्येक पायरीशी समर्पकरित्या जुळवून घेण्याची क्षमता ठेवता आली पाहिजे.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.
विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
यशासाठी एकेक पायरी महत्वाची असते याचा अर्थ असा की तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारं छोट्यातलं छोटं ज्ञान/कोशल्य देखील महत्वाचं असतं. हे अगदीच सोप्पंय, मी सहज करून देईन हा अॅटिट्युड तिथे बाजुला ठेवून प्रत्येक पायरीशी समर्पकरित्या जुळवून घेण्याची क्षमता ठेवता आली पाहिजे.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.