जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.
तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.
तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..