जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!