जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.
रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
किमान चारदोन निवडीची लोकं सोबत असावीतच कायमसाठी. कारण अंधारात, एकट्याच्या संघर्षात कुणी नसल्याची उणीव फारशी पोकळी मनाला जावणत नाही पण जेव्हा विजयात कुणीच सामिल नसतं, तेव्हा प्रचंड त्रास होतो. कारण मानवाला मुळ स्वभावत:च एखादी तरी संगत गरजेची असते, मानव हा एकलकोंडा स्वभावाचा नसतो.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.
रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
किमान चारदोन निवडीची लोकं सोबत असावीतच कायमसाठी. कारण अंधारात, एकट्याच्या संघर्षात कुणी नसल्याची उणीव फारशी पोकळी मनाला जावणत नाही पण जेव्हा विजयात कुणीच सामिल नसतं, तेव्हा प्रचंड त्रास होतो. कारण मानवाला मुळ स्वभावत:च एखादी तरी संगत गरजेची असते, मानव हा एकलकोंडा स्वभावाचा नसतो.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.