जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...
भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...
भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.