इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.