तुमच्या मनात जर राग, द्वेष वा सतत एखाद्या गोष्टीचा संकोच साचून राहू लागला तर तुम्ही तुमच्या शारिरिक आरोग्याला नकळत हानी पोहोचवू लागता व त्यातूनच मानसिक खच्चीकरणही व्हायला सुरूवात होते त्यामुळे सहसा आनंदी, मनाला तेजस्वी व शक्य तितकं साधेपणाने जपत चला बाकी गोष्टी सर्व आपोआप चांगल्या घडत राहतील.
मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.
सहसा कधीही इतरांविषयी मनात पुर्वाग्रह निर्माण करू नका. व इतरांची निंदा करण्याचा मानसही कधी जोपासू नका. ध्येयाप्रती स्वत:च्या चांगलेपणाबद्दल विचार करत पुढे चाला. ध्येय मिळेपर्यंत सहसा प्रचंड स्वत:बद्दल चांगल, वैचारिक व विवेकी सद्भावना ठेवून प्रयत्न करत चला. तुमच्या सर्व सकारात्मक उर्जेचा एक दिवस यशाच्या शिखरावर गौरव होणार याची खात्री बाळगत चला.
जिवणाला फार कटीबद्ध करू नका. नियम लावून विनाकारण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला हरवू नका, शिस्त जरुर असावी पण नियमांचा अतिकाटेकोरपणा जगण्यातला आनंद हिरावून घेतो याचीही जाणिव ठेवा.
तुमच्या मनात जर राग, द्वेष वा सतत एखाद्या गोष्टीचा संकोच साचून राहू लागला तर तुम्ही तुमच्या शारिरिक आरोग्याला नकळत हानी पोहोचवू लागता व त्यातूनच मानसिक खच्चीकरणही व्हायला सुरूवात होते त्यामुळे सहसा आनंदी, मनाला तेजस्वी व शक्य तितकं साधेपणाने जपत चला बाकी गोष्टी सर्व आपोआप चांगल्या घडत राहतील.
मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.
सहसा कधीही इतरांविषयी मनात पुर्वाग्रह निर्माण करू नका. व इतरांची निंदा करण्याचा मानसही कधी जोपासू नका. ध्येयाप्रती स्वत:च्या चांगलेपणाबद्दल विचार करत पुढे चाला. ध्येय मिळेपर्यंत सहसा प्रचंड स्वत:बद्दल चांगल, वैचारिक व विवेकी सद्भावना ठेवून प्रयत्न करत चला. तुमच्या सर्व सकारात्मक उर्जेचा एक दिवस यशाच्या शिखरावर गौरव होणार याची खात्री बाळगत चला.
जिवणाला फार कटीबद्ध करू नका. नियम लावून विनाकारण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला हरवू नका, शिस्त जरुर असावी पण नियमांचा अतिकाटेकोरपणा जगण्यातला आनंद हिरावून घेतो याचीही जाणिव ठेवा.