प्रत्येकाची कुवत आणि आपापल्या आकलन क्षमता या वेगवेगळ्या असतात; त्यामुळे एखादा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतोयं, मी तितक्या प्रमाणात काहीच करत नाही वगैरे म्हणतं स्वतःला कमी लेखाची गरज नाही. अशाने अकारण आपल्याला न्युनगंड तयार होऊ लागतो.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.
नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
प्रत्येकाची कुवत आणि आपापल्या आकलन क्षमता या वेगवेगळ्या असतात; त्यामुळे एखादा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतोयं, मी तितक्या प्रमाणात काहीच करत नाही वगैरे म्हणतं स्वतःला कमी लेखाची गरज नाही. अशाने अकारण आपल्याला न्युनगंड तयार होऊ लागतो.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.
नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”