आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.
प्रत्येकाची कुवत आणि आपापल्या आकलन क्षमता या वेगवेगळ्या असतात; त्यामुळे एखादा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतोयं, मी तितक्या प्रमाणात काहीच करत नाही वगैरे म्हणतं स्वतःला कमी लेखाची गरज नाही. अशाने अकारण आपल्याला न्युनगंड तयार होऊ लागतो.
खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.
प्रत्येकाची कुवत आणि आपापल्या आकलन क्षमता या वेगवेगळ्या असतात; त्यामुळे एखादा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतोयं, मी तितक्या प्रमाणात काहीच करत नाही वगैरे म्हणतं स्वतःला कमी लेखाची गरज नाही. अशाने अकारण आपल्याला न्युनगंड तयार होऊ लागतो.
खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.