भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
अनेकदा आपलं बोलण्यातली लय ही आपल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठसा समोरच्या व्यक्तींवर उमटवत असते. त्यामुळे अनेकदा असं घडू शकतं की, तुमच्या शब्दश: अर्थांना चुकीच्या पद्धतीने वा गैरसमजाने समोरचा समजून घेईन. तेव्हा अधिक वाईट न वाटता व रागात न येता तुमच्या संवादातील योग्यता पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न करा. हे जग नात्यातील वादांमधे गुरफटून रहायला खुप छोट आहे. व मुळात नाती जपलीत की मानसिक स्वास्थ्य आपोआप स्थिर रहायला मदत होते.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो; माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात तो कधीतरी चुकून एखाद्याचा तिरस्कार करू शकतो पण मग या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.
भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
अनेकदा आपलं बोलण्यातली लय ही आपल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठसा समोरच्या व्यक्तींवर उमटवत असते. त्यामुळे अनेकदा असं घडू शकतं की, तुमच्या शब्दश: अर्थांना चुकीच्या पद्धतीने वा गैरसमजाने समोरचा समजून घेईन. तेव्हा अधिक वाईट न वाटता व रागात न येता तुमच्या संवादातील योग्यता पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न करा. हे जग नात्यातील वादांमधे गुरफटून रहायला खुप छोट आहे. व मुळात नाती जपलीत की मानसिक स्वास्थ्य आपोआप स्थिर रहायला मदत होते.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो; माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात तो कधीतरी चुकून एखाद्याचा तिरस्कार करू शकतो पण मग या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.