अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.