शारिरीक क्षमता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण प्रत्येक माणसाच्या अंतर्गत शरिरात जो मेंदू असतो तो फार मोठ्या प्रमाणावर युक्तीचा/बुद्धीचा स्त्रोत असतो. मेंदूला जितक्या प्रमाणात तुम्ही रोज माहिती आणि ज्ञानाचा खुराक खाऊ घालालं तितकाच तो बलाढ्य होत जात असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अंतर्गत क्षमतांच्या आधारे कोणताही पण आपल्याला जिंकता येईल इतकं स्वत:ला सक्षम आणि प्रभावी बनवलं पाहिजे.
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.
आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.
अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.
तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.
शारिरीक क्षमता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण प्रत्येक माणसाच्या अंतर्गत शरिरात जो मेंदू असतो तो फार मोठ्या प्रमाणावर युक्तीचा/बुद्धीचा स्त्रोत असतो. मेंदूला जितक्या प्रमाणात तुम्ही रोज माहिती आणि ज्ञानाचा खुराक खाऊ घालालं तितकाच तो बलाढ्य होत जात असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अंतर्गत क्षमतांच्या आधारे कोणताही पण आपल्याला जिंकता येईल इतकं स्वत:ला सक्षम आणि प्रभावी बनवलं पाहिजे.
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.
आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.
अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.
तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.