स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.
तुमचे गट्स अर्थात तुमचा धैर्यपणा, हिम्मत ही गोष्ट अतीशय महत्त्वाची ठरते. एखादा निर्णय घेताक्षणी, एखाद्या ठिकाणी अडचणीत जरी पडू लागलो तरी हिमतीने मी सर्व सारुन नेईन हा ठामपणा दाखवणे, या गोष्टीच तुम्हाला सर्वार्थाने आयुष्याच्या इतर कोणत्याही प्रचंड संकटातून वाचवत असतात. त्यामुळे गरजेच्या वेळी गट्स बाळगले पाहिजेत थोडक्यात हिम्मत बाळगली पाहिजे.
करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.
तुमचे गट्स अर्थात तुमचा धैर्यपणा, हिम्मत ही गोष्ट अतीशय महत्त्वाची ठरते. एखादा निर्णय घेताक्षणी, एखाद्या ठिकाणी अडचणीत जरी पडू लागलो तरी हिमतीने मी सर्व सारुन नेईन हा ठामपणा दाखवणे, या गोष्टीच तुम्हाला सर्वार्थाने आयुष्याच्या इतर कोणत्याही प्रचंड संकटातून वाचवत असतात. त्यामुळे गरजेच्या वेळी गट्स बाळगले पाहिजेत थोडक्यात हिम्मत बाळगली पाहिजे.
करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.