जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.
प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.
जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.
प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.
जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.