सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे....
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे....
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.