आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
प्रत्येकाचा एक असा मित्र असतो जो आपल्याला वाक्यावाक्याला नकारार्थी बोलून, चुकून का असेना पण खच्चीकरण करत असतो. तर अशांच्या बोलण्याला फार महत्व न देता एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून बिनधास्त आपल्या योजनांवर ठामपणे लक्ष देऊन चालायचं.
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
प्रत्येकाचा एक असा मित्र असतो जो आपल्याला वाक्यावाक्याला नकारार्थी बोलून, चुकून का असेना पण खच्चीकरण करत असतो. तर अशांच्या बोलण्याला फार महत्व न देता एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून बिनधास्त आपल्या योजनांवर ठामपणे लक्ष देऊन चालायचं.
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!