अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
गुणवत्ता जन्मजात असावी लागते असं काही नसतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन जडणघडणीत कशा पद्धतीने स्वत:ला आकार देत जाता त्या गोष्टी भविष्यात तुमची गुणवत्ता ठरवतात. छोट्याछोट्या मुद्दयांचे विचारदेखील तुमच्या जडणघडणीत भर टाकत असतात.
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
गुणवत्ता जन्मजात असावी लागते असं काही नसतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन जडणघडणीत कशा पद्धतीने स्वत:ला आकार देत जाता त्या गोष्टी भविष्यात तुमची गुणवत्ता ठरवतात. छोट्याछोट्या मुद्दयांचे विचारदेखील तुमच्या जडणघडणीत भर टाकत असतात.
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..