समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.
भरकटू नका. बऱ्याचदा भविष्यात कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या गोष्टी या सुरूवातीच्या टप्यांवर प्रचंड वेळ घेत राहतात; त्यावेळी अशा परिस्थितीत मन:स्थिती अगदी एकरूप, संघटित व घट्ट प्रमाणात एकवटून ठेवावी लागते. टिकवलेल्या मनाच्या धैर्याचा, आपल्या दिशेचा, आपल्या योजनांचा बांध हा फुटू द्यायचा नसतो. एक, दोन प्रयत्न वा योजना जरी चुकल्या तरी दिर्घ ध्येयाकडे जाणारी योजना ही सखोल व्यापक असते इतकं लक्षात ठेवा.
तुम्ही ध्येय मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, अनेकदा तणावात काम करण्याची तयारी स्वत:च्या मनाला खंबीरपणे सांगून केली पाहिजे, अनेकदा गंभीर स्थितीत मनाला शांत ठेवून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत अन हे सर्व जमण्यासाठी दिवसेंदिवस मनोधैर्य सक्षम ठेवण्यावर भर दिला पाहिजे.
खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.
समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.
भरकटू नका. बऱ्याचदा भविष्यात कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या गोष्टी या सुरूवातीच्या टप्यांवर प्रचंड वेळ घेत राहतात; त्यावेळी अशा परिस्थितीत मन:स्थिती अगदी एकरूप, संघटित व घट्ट प्रमाणात एकवटून ठेवावी लागते. टिकवलेल्या मनाच्या धैर्याचा, आपल्या दिशेचा, आपल्या योजनांचा बांध हा फुटू द्यायचा नसतो. एक, दोन प्रयत्न वा योजना जरी चुकल्या तरी दिर्घ ध्येयाकडे जाणारी योजना ही सखोल व्यापक असते इतकं लक्षात ठेवा.
तुम्ही ध्येय मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, अनेकदा तणावात काम करण्याची तयारी स्वत:च्या मनाला खंबीरपणे सांगून केली पाहिजे, अनेकदा गंभीर स्थितीत मनाला शांत ठेवून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत अन हे सर्व जमण्यासाठी दिवसेंदिवस मनोधैर्य सक्षम ठेवण्यावर भर दिला पाहिजे.
खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.