प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
किमान चारदोन निवडीची लोकं सोबत असावीतच कायमसाठी. कारण अंधारात, एकट्याच्या संघर्षात कुणी नसल्याची उणीव फारशी पोकळी मनाला जावणत नाही पण जेव्हा विजयात कुणीच सामिल नसतं, तेव्हा प्रचंड त्रास होतो. कारण मानवाला मुळ स्वभावत:च एखादी तरी संगत गरजेची असते, मानव हा एकलकोंडा स्वभावाचा नसतो.
निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
किमान चारदोन निवडीची लोकं सोबत असावीतच कायमसाठी. कारण अंधारात, एकट्याच्या संघर्षात कुणी नसल्याची उणीव फारशी पोकळी मनाला जावणत नाही पण जेव्हा विजयात कुणीच सामिल नसतं, तेव्हा प्रचंड त्रास होतो. कारण मानवाला मुळ स्वभावत:च एखादी तरी संगत गरजेची असते, मानव हा एकलकोंडा स्वभावाचा नसतो.
निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....