माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.
निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
हे अमुकतमुक असचं आहे किंवा आपल्यासारख्यांसोबत असचं होत राहतं वगैरे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा नकळतपणे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर तुम्ही बंधन आणत असता. ही बंधन नकळतपणे रूजत गेली तर नंतर तुम्ही सारंकाही पुर्वग्रह लावत स्वत:ला बंदिस्त करून जगता व चुकीच्या मार्गात अडकत जाता, त्यामुळे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवत कायम स्वत:ला नव्या पैलूंच्या शोधात ठेवत चला व स्वत:च्या ईच्छाशक्तीवर बंधणं लावू नका.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.
निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
हे अमुकतमुक असचं आहे किंवा आपल्यासारख्यांसोबत असचं होत राहतं वगैरे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा नकळतपणे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर तुम्ही बंधन आणत असता. ही बंधन नकळतपणे रूजत गेली तर नंतर तुम्ही सारंकाही पुर्वग्रह लावत स्वत:ला बंदिस्त करून जगता व चुकीच्या मार्गात अडकत जाता, त्यामुळे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवत कायम स्वत:ला नव्या पैलूंच्या शोधात ठेवत चला व स्वत:च्या ईच्छाशक्तीवर बंधणं लावू नका.