तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.
अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.
अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.