ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.
तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.
आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.
तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.
कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही
संघर्ष सुरू असतानाच्या काळात एखादी दैनंदिनी लिहित असालं तर त्यात रोज खचल्यावर इतकं स्वत:ला सांगत चला की, ही वेळ वाईट असली तरी तुम्ही धैर्यवान आहात. किंवा दैनंदिनी लिहत नसाल तरी एखाद्या रोजच्या अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून स्वत:ला ठामपणे बजावत चला.
ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.
तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.
आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.
तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.
कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही
संघर्ष सुरू असतानाच्या काळात एखादी दैनंदिनी लिहित असालं तर त्यात रोज खचल्यावर इतकं स्वत:ला सांगत चला की, ही वेळ वाईट असली तरी तुम्ही धैर्यवान आहात. किंवा दैनंदिनी लिहत नसाल तरी एखाद्या रोजच्या अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून स्वत:ला ठामपणे बजावत चला.