आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.
मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.
“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.
खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.
मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.
“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.
खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.