तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
प्रत्येकाची कुवत आणि आपापल्या आकलन क्षमता या वेगवेगळ्या असतात; त्यामुळे एखादा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतोयं, मी तितक्या प्रमाणात काहीच करत नाही वगैरे म्हणतं स्वतःला कमी लेखाची गरज नाही. अशाने अकारण आपल्याला न्युनगंड तयार होऊ लागतो.
प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
प्रत्येकाची कुवत आणि आपापल्या आकलन क्षमता या वेगवेगळ्या असतात; त्यामुळे एखादा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतोयं, मी तितक्या प्रमाणात काहीच करत नाही वगैरे म्हणतं स्वतःला कमी लेखाची गरज नाही. अशाने अकारण आपल्याला न्युनगंड तयार होऊ लागतो.
प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.