वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
सहसा कधीही इतरांविषयी मनात पुर्वाग्रह निर्माण करू नका. व इतरांची निंदा करण्याचा मानसही कधी जोपासू नका. ध्येयाप्रती स्वत:च्या चांगलेपणाबद्दल विचार करत पुढे चाला. ध्येय मिळेपर्यंत सहसा प्रचंड स्वत:बद्दल चांगल, वैचारिक व विवेकी सद्भावना ठेवून प्रयत्न करत चला. तुमच्या सर्व सकारात्मक उर्जेचा एक दिवस यशाच्या शिखरावर गौरव होणार याची खात्री बाळगत चला.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
सहसा कधीही इतरांविषयी मनात पुर्वाग्रह निर्माण करू नका. व इतरांची निंदा करण्याचा मानसही कधी जोपासू नका. ध्येयाप्रती स्वत:च्या चांगलेपणाबद्दल विचार करत पुढे चाला. ध्येय मिळेपर्यंत सहसा प्रचंड स्वत:बद्दल चांगल, वैचारिक व विवेकी सद्भावना ठेवून प्रयत्न करत चला. तुमच्या सर्व सकारात्मक उर्जेचा एक दिवस यशाच्या शिखरावर गौरव होणार याची खात्री बाळगत चला.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.