वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.