वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.
काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.
तुम्ही ध्येय मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, अनेकदा तणावात काम करण्याची तयारी स्वत:च्या मनाला खंबीरपणे सांगून केली पाहिजे, अनेकदा गंभीर स्थितीत मनाला शांत ठेवून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत अन हे सर्व जमण्यासाठी दिवसेंदिवस मनोधैर्य सक्षम ठेवण्यावर भर दिला पाहिजे.
तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.
तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.
काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.
तुम्ही ध्येय मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, अनेकदा तणावात काम करण्याची तयारी स्वत:च्या मनाला खंबीरपणे सांगून केली पाहिजे, अनेकदा गंभीर स्थितीत मनाला शांत ठेवून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत अन हे सर्व जमण्यासाठी दिवसेंदिवस मनोधैर्य सक्षम ठेवण्यावर भर दिला पाहिजे.
तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.