वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.