वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
संयमाची परीक्षा अलीकडच्या काळात खुप गरजेची ठरते, इथे पावलापालांना लोकांना तुमच्याकडून काहीतरी सर्वोत्कृष्ट हवं असतं पण भले स्वत:ची आयुष्याची काही कार्ये का नसेनात. त्यामुळे लोकांना तुम्हाला रोज ट्रोल करू देत चला, तुम्ही धीरानं त्या शब्दांना, त्या अवमानांना घेत एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून त्यांना उत्तर द्या.
कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
तुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या.
संयमाची परीक्षा अलीकडच्या काळात खुप गरजेची ठरते, इथे पावलापालांना लोकांना तुमच्याकडून काहीतरी सर्वोत्कृष्ट हवं असतं पण भले स्वत:ची आयुष्याची काही कार्ये का नसेनात. त्यामुळे लोकांना तुम्हाला रोज ट्रोल करू देत चला, तुम्ही धीरानं त्या शब्दांना, त्या अवमानांना घेत एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून त्यांना उत्तर द्या.
कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
तुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या.