वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.
मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.
स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.
दृष्टिकोण फार स्पष्ट ठेवा, आत्मविश्वास आपोआप वाढत राहिलं.
करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.
मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.
स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.
दृष्टिकोण फार स्पष्ट ठेवा, आत्मविश्वास आपोआप वाढत राहिलं.