अनेकदा आपलं बोलण्यातली लय ही आपल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठसा समोरच्या व्यक्तींवर उमटवत असते. त्यामुळे अनेकदा असं घडू शकतं की, तुमच्या शब्दश: अर्थांना चुकीच्या पद्धतीने वा गैरसमजाने समोरचा समजून घेईन. तेव्हा अधिक वाईट न वाटता व रागात न येता तुमच्या संवादातील योग्यता पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न करा. हे जग नात्यातील वादांमधे गुरफटून रहायला खुप छोट आहे. व मुळात नाती जपलीत की मानसिक स्वास्थ्य आपोआप स्थिर रहायला मदत होते.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
गंजून संपण्यापेक्षा झिंजून संपणे नेहमीच चांगले
परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
गंजून संपण्यापेक्षा झिंजून संपणे नेहमीच चांगले
परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.