अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.

 
0

अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.

अंशुलिखित