अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत.....
अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.
“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”
माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत.....
अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.
“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”
माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.