अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."

अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."

अंशुलिखित
Share:

More Like This

नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसू नका, स्वत:ला इतरांना समजावत बसू नका; ही वेळ कमखर असते. ती अशा लोकांना तुमच्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं.

किरण पवार (अंशु)

आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.

किरण पवार (अंशु)

अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.

किरण पवार (अंशु)

तुम्ही स्वत:ला जितकं प्रखरपणे पाण्यासारखं विचारप्रवाहाला नितळ वाहू द्यालं तितकं तुमच्या मानसिक व इतर बाह्यघटांसाठी चांगल असतं. एखादा विचार सतत डोक्यात अडून राहिला तर मनावर नकारात्मक व वाईट विचारांची जळमटं चढायला अधिक वेळ लागत नाही.

किरण पवार (अंशु)

जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.

किरण पवार (निनावी)

नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसू नका, स्वत:ला इतरांना समजावत बसू नका; ही वेळ कमखर असते. ती अशा लोकांना तुमच्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं.

किरण पवार (अंशु)

आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.

किरण पवार (अंशु)

अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.

किरण पवार (अंशु)

तुम्ही स्वत:ला जितकं प्रखरपणे पाण्यासारखं विचारप्रवाहाला नितळ वाहू द्यालं तितकं तुमच्या मानसिक व इतर बाह्यघटांसाठी चांगल असतं. एखादा विचार सतत डोक्यात अडून राहिला तर मनावर नकारात्मक व वाईट विचारांची जळमटं चढायला अधिक वेळ लागत नाही.

किरण पवार (अंशु)

जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.

किरण पवार (निनावी)