अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.
सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा , स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.
सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा , स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.