अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."
सहसा अनेकदा आपण अकारण इतरांच्या प्रगतीशी स्वत:च्या वयासोबत तुलना करत राहतो, त्याने अमुकतमुक वयात हे केलं ते केलं, हे मिळवलं वगैरे वगैरे... परंतु कायम ध्यानात ठेवा की ज्याने ज्या वयात जे मिळवलं आहे, त्यासाठी त्याच्या आजुबाजुला गोष्टी व परिस्थिती तशी व तेवढी पुरेशी होती. किंबहुना जरी नसली तरी काहीतरी असं असेल जे आपल्या परिसरात नाही वा आपल्यात कदाचित नाही. परिस्थिती यशाला सामोरं जाण्याआधी तुम्हाला सर्वांगाने सशक्त बनवत असते, त्यामुळे स्वत:वर विश्वास बाळगत व इतर गोष्टींचा मुळ दृष्टीकोन यांचा आढावा घेत चला.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
सहसा अनेकदा आपण अकारण इतरांच्या प्रगतीशी स्वत:च्या वयासोबत तुलना करत राहतो, त्याने अमुकतमुक वयात हे केलं ते केलं, हे मिळवलं वगैरे वगैरे... परंतु कायम ध्यानात ठेवा की ज्याने ज्या वयात जे मिळवलं आहे, त्यासाठी त्याच्या आजुबाजुला गोष्टी व परिस्थिती तशी व तेवढी पुरेशी होती. किंबहुना जरी नसली तरी काहीतरी असं असेल जे आपल्या परिसरात नाही वा आपल्यात कदाचित नाही. परिस्थिती यशाला सामोरं जाण्याआधी तुम्हाला सर्वांगाने सशक्त बनवत असते, त्यामुळे स्वत:वर विश्वास बाळगत व इतर गोष्टींचा मुळ दृष्टीकोन यांचा आढावा घेत चला.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.