अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."
प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.
अति लालसा अर्थात अतिलोभ हा तुमच्या स्वत:तील चांगुलपणाला आणि निरागसतेला नष्ट करून टाकतो. आपल्या आजुबाजुला अनेकदा वाईट लोकांची गाठ आपल्याला पडते परंतु त्यांच्याशी बुद्धिने विवेकाला शांत ठेवून आपण वागू शकलो तर आपण आपल्या प्रगतीकडेच एकप्रकारे वाटचाल करत असतो.
प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.
अति लालसा अर्थात अतिलोभ हा तुमच्या स्वत:तील चांगुलपणाला आणि निरागसतेला नष्ट करून टाकतो. आपल्या आजुबाजुला अनेकदा वाईट लोकांची गाठ आपल्याला पडते परंतु त्यांच्याशी बुद्धिने विवेकाला शांत ठेवून आपण वागू शकलो तर आपण आपल्या प्रगतीकडेच एकप्रकारे वाटचाल करत असतो.