निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.
भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.