निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.