आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.
कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.
कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.