आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.