आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...
तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही....
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...
तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही....
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.