तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता जिद्दीने कष्ट घेत असताना तुम्हाला तुमच्या "एकाग्रतेच्या" क्षमतेवर उत्तमपणे प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. एकाग्रता असणं अर्थातच त्या कार्यात मग्नता अन त्यातले संपुर्ण आराखडे नाजुकपणे टिपून आपल्यात साठवण्याची क्षमता अधिक हवी. खरतरं एकाग्रतेने तुमच्या कार्यातल्या अनेक बाधाही सहजपणे नष्ट होतात. अवांतर वाचण करणं, आवडत्या गोष्टी करणं यातुन एकाग्रता वाढते.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.
निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.
आयुष्याला खळखळाट असण्याऐवजी संथता आणि नितळता असावी; म्हणजे जे शांत आणि कायम स्पष्ट असतं ते स्वभावालाही खुलवतं आणि आपल्याला ध्येयाजवळ जाण्यात मदतही करतं. स्वभाव हादेखील एक अप्रतिम दागिना आहे, ज्याने जग जिंकता येऊ शकतं.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.
निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.
आयुष्याला खळखळाट असण्याऐवजी संथता आणि नितळता असावी; म्हणजे जे शांत आणि कायम स्पष्ट असतं ते स्वभावालाही खुलवतं आणि आपल्याला ध्येयाजवळ जाण्यात मदतही करतं. स्वभाव हादेखील एक अप्रतिम दागिना आहे, ज्याने जग जिंकता येऊ शकतं.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.