भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
राग वाईट गोष्ट असली आणि आपण तिला अनेक प्रसंगांमधे संयमाने घेण्याचा प्रयत्न दरवेळी करत जर असलो तर एखादवेळेस तो राग बाहेर पडणं गरजेच असतं. मानवी स्वभाव हा सर्वच भावनांना व्यक्त करण्यासाठी असतो. फक्त एवढी निश्चितता रागात ठेवावी की आपण एखाद्याला प्रमाणाबाहेर दुखावणार नाही. वा नुकसान करणार नाही.
उठा आणि संघर्ष करा!
वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.
आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
राग वाईट गोष्ट असली आणि आपण तिला अनेक प्रसंगांमधे संयमाने घेण्याचा प्रयत्न दरवेळी करत जर असलो तर एखादवेळेस तो राग बाहेर पडणं गरजेच असतं. मानवी स्वभाव हा सर्वच भावनांना व्यक्त करण्यासाठी असतो. फक्त एवढी निश्चितता रागात ठेवावी की आपण एखाद्याला प्रमाणाबाहेर दुखावणार नाही. वा नुकसान करणार नाही.
उठा आणि संघर्ष करा!
वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.