भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.