भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.
स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.
जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.
स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.
जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही