भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
संयमाची परीक्षा अलीकडच्या काळात खुप गरजेची ठरते, इथे पावलापालांना लोकांना तुमच्याकडून काहीतरी सर्वोत्कृष्ट हवं असतं पण भले स्वत:ची आयुष्याची काही कार्ये का नसेनात. त्यामुळे लोकांना तुम्हाला रोज ट्रोल करू देत चला, तुम्ही धीरानं त्या शब्दांना, त्या अवमानांना घेत एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून त्यांना उत्तर द्या.
ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.
हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
संयमाची परीक्षा अलीकडच्या काळात खुप गरजेची ठरते, इथे पावलापालांना लोकांना तुमच्याकडून काहीतरी सर्वोत्कृष्ट हवं असतं पण भले स्वत:ची आयुष्याची काही कार्ये का नसेनात. त्यामुळे लोकांना तुम्हाला रोज ट्रोल करू देत चला, तुम्ही धीरानं त्या शब्दांना, त्या अवमानांना घेत एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून त्यांना उत्तर द्या.
ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.