भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
तुमच्या मनातील नव्या योजना, कल्पनाशक्ती किंवा इतर काही प्रकल्पांच्या ज्या प्रथमदर्शनी गोष्टी असतात त्या इतर लोकांच्या नजरेत प्रथमत: चुकीच्या ठरू शकतात कारण त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी कधी एखादा तशा प्रकारच्या योजनांना जिवणात साकार झालेला प्रवाह कधीच पाहिलेला नसतो. त्यामुळे, तुमच्या योजनांना कोणाच्या सल्ल्याने ऐकून त्यांना थांबू देऊ नका. काम करत रहा, ऊजेडात त्यांना चुकीची प्रचिती होईलच.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
तुमच्या मनातील नव्या योजना, कल्पनाशक्ती किंवा इतर काही प्रकल्पांच्या ज्या प्रथमदर्शनी गोष्टी असतात त्या इतर लोकांच्या नजरेत प्रथमत: चुकीच्या ठरू शकतात कारण त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी कधी एखादा तशा प्रकारच्या योजनांना जिवणात साकार झालेला प्रवाह कधीच पाहिलेला नसतो. त्यामुळे, तुमच्या योजनांना कोणाच्या सल्ल्याने ऐकून त्यांना थांबू देऊ नका. काम करत रहा, ऊजेडात त्यांना चुकीची प्रचिती होईलच.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.