भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
यशाच्या व्याख्येसंबंधी गैरसमज कधीच बांधू नका, प्रत्येक यशस्वी झालेल्या व्यक्तीचे अनुभव वेगळे आहेत त्यानुसार वेगळ्या व्याख्या तयार होत राहत आहेत. त्यात या सोशल मिडीयाच्या जमान्यात फारच भिन्नभिन्न प्रकार नव्याने रोज पहायला मिळतात. तुम्ही फक्त मेहनत, सातत्य, कौशल्य विकसित करणं, स्वत:ला योग्य वेळ देणं, स्वत:च्या अपयशाची कारणमिमांसा करून त्यावर विचारविनिमय करणं यावर ठाम रहा. एक दिवश यशाला तुम्हाला गवसणी घालावीच लागेल.
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.
तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
यशाच्या व्याख्येसंबंधी गैरसमज कधीच बांधू नका, प्रत्येक यशस्वी झालेल्या व्यक्तीचे अनुभव वेगळे आहेत त्यानुसार वेगळ्या व्याख्या तयार होत राहत आहेत. त्यात या सोशल मिडीयाच्या जमान्यात फारच भिन्नभिन्न प्रकार नव्याने रोज पहायला मिळतात. तुम्ही फक्त मेहनत, सातत्य, कौशल्य विकसित करणं, स्वत:ला योग्य वेळ देणं, स्वत:च्या अपयशाची कारणमिमांसा करून त्यावर विचारविनिमय करणं यावर ठाम रहा. एक दिवश यशाला तुम्हाला गवसणी घालावीच लागेल.
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.
तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!