तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.