तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.