तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
स्वत:च आत्मपरीक्षण काही ठराविक नियमांच्या आधारे करायचं असतं. त्यासाठी आवश्यक ते तर्क, नियम, कटीबद्ध शिस्त वगैरेंची परिसिमा स्वत: ठरवून योग्यरित्या त्या दिशेत अवलंब करत आत्मपरीक्षण करावे.
तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
स्वत:च आत्मपरीक्षण काही ठराविक नियमांच्या आधारे करायचं असतं. त्यासाठी आवश्यक ते तर्क, नियम, कटीबद्ध शिस्त वगैरेंची परिसिमा स्वत: ठरवून योग्यरित्या त्या दिशेत अवलंब करत आत्मपरीक्षण करावे.
तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.