तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.
तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.
तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....