तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
यशाच्या व्याख्येसंबंधी गैरसमज कधीच बांधू नका, प्रत्येक यशस्वी झालेल्या व्यक्तीचे अनुभव वेगळे आहेत त्यानुसार वेगळ्या व्याख्या तयार होत राहत आहेत. त्यात या सोशल मिडीयाच्या जमान्यात फारच भिन्नभिन्न प्रकार नव्याने रोज पहायला मिळतात. तुम्ही फक्त मेहनत, सातत्य, कौशल्य विकसित करणं, स्वत:ला योग्य वेळ देणं, स्वत:च्या अपयशाची कारणमिमांसा करून त्यावर विचारविनिमय करणं यावर ठाम रहा. एक दिवश यशाला तुम्हाला गवसणी घालावीच लागेल.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
यशाच्या व्याख्येसंबंधी गैरसमज कधीच बांधू नका, प्रत्येक यशस्वी झालेल्या व्यक्तीचे अनुभव वेगळे आहेत त्यानुसार वेगळ्या व्याख्या तयार होत राहत आहेत. त्यात या सोशल मिडीयाच्या जमान्यात फारच भिन्नभिन्न प्रकार नव्याने रोज पहायला मिळतात. तुम्ही फक्त मेहनत, सातत्य, कौशल्य विकसित करणं, स्वत:ला योग्य वेळ देणं, स्वत:च्या अपयशाची कारणमिमांसा करून त्यावर विचारविनिमय करणं यावर ठाम रहा. एक दिवश यशाला तुम्हाला गवसणी घालावीच लागेल.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.