तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.