तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.
प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!
जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.
कधीकधी ध्येयाच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याकरता वाटेत येणारे मिसिंग डॉट्स भरायचे असतात. हे मिसिंग डॉट्स शोधायची दृष्टी थोडी प्रगल्भ करता यायला हवी इतकाचं मुद्दा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गायक व्हायचंय पण त्याआधी थोडेसे गाणे कंपोझ करता येतायेत तर कंपोझिशनमधे इंडस्ट्रीत मोठी जागा रिकामी असेल तर अर्थात ती मिसिंग डॉट आहे. अन तो तात्पुरत्या वेळेकरता तुम्ही भरू शकलात तर पुढे चालून मुख्य गायकी ध्येयही आत्मसात करता येतं. ही टेक्निक विविध क्षेत्रात विविध पद्धतीने वापरावी. अभ्यासात एखादा टॉपिक अधिक मार्कांचा असला अन पर्यायी (ऑप्शनल) दुसरे दोन छोटे टॉपिक त्याच लेव्हलला असतील वा थोडं अधिक असेल तर तेच दोन टॉपिक करणं म्हणजे मिसिंग डॉट्स भरून पुढे जाणं.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.
प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!
जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.
कधीकधी ध्येयाच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याकरता वाटेत येणारे मिसिंग डॉट्स भरायचे असतात. हे मिसिंग डॉट्स शोधायची दृष्टी थोडी प्रगल्भ करता यायला हवी इतकाचं मुद्दा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गायक व्हायचंय पण त्याआधी थोडेसे गाणे कंपोझ करता येतायेत तर कंपोझिशनमधे इंडस्ट्रीत मोठी जागा रिकामी असेल तर अर्थात ती मिसिंग डॉट आहे. अन तो तात्पुरत्या वेळेकरता तुम्ही भरू शकलात तर पुढे चालून मुख्य गायकी ध्येयही आत्मसात करता येतं. ही टेक्निक विविध क्षेत्रात विविध पद्धतीने वापरावी. अभ्यासात एखादा टॉपिक अधिक मार्कांचा असला अन पर्यायी (ऑप्शनल) दुसरे दोन छोटे टॉपिक त्याच लेव्हलला असतील वा थोडं अधिक असेल तर तेच दोन टॉपिक करणं म्हणजे मिसिंग डॉट्स भरून पुढे जाणं.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.