तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.
जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.
जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.