तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.