तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.