तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.
निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
तुमचा स्वभाव अनेकदा तुमच्या आयुष्यातले संकटे, मार्गात येऊ घातलेले अडथळे सहजरित्या नाहीसे करतो... कारण स्वभावात जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनाची अन सहजतेने एखादा विषय हाताळण्याची कला जी अंगात मुरल्या जाते तीच कला मुळात जगण्यात गरजेची असते. त्यामुळे रोजच्या जिवणात स्वभावाला स्थैर्य देण्याच कार्य करा बाकी आपोआप सर्व ठीकचं होईल.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.
निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
तुमचा स्वभाव अनेकदा तुमच्या आयुष्यातले संकटे, मार्गात येऊ घातलेले अडथळे सहजरित्या नाहीसे करतो... कारण स्वभावात जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनाची अन सहजतेने एखादा विषय हाताळण्याची कला जी अंगात मुरल्या जाते तीच कला मुळात जगण्यात गरजेची असते. त्यामुळे रोजच्या जिवणात स्वभावाला स्थैर्य देण्याच कार्य करा बाकी आपोआप सर्व ठीकचं होईल.