तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.