तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.
जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.
जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.