तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.
जिवणाला फार कटीबद्ध करू नका. नियम लावून विनाकारण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला हरवू नका, शिस्त जरुर असावी पण नियमांचा अतिकाटेकोरपणा जगण्यातला आनंद हिरावून घेतो याचीही जाणिव ठेवा.
तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.
जिवणाला फार कटीबद्ध करू नका. नियम लावून विनाकारण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला हरवू नका, शिस्त जरुर असावी पण नियमांचा अतिकाटेकोरपणा जगण्यातला आनंद हिरावून घेतो याचीही जाणिव ठेवा.