तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे....
कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे....
कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!