तुमचे गट्स अर्थात तुमचा धैर्यपणा, हिम्मत ही गोष्ट अतीशय महत्त्वाची ठरते. एखादा निर्णय घेताक्षणी, एखाद्या ठिकाणी अडचणीत जरी पडू लागलो तरी हिमतीने मी सर्व सारुन नेईन हा ठामपणा दाखवणे, या गोष्टीच तुम्हाला सर्वार्थाने आयुष्याच्या इतर कोणत्याही प्रचंड संकटातून वाचवत असतात. त्यामुळे गरजेच्या वेळी गट्स बाळगले पाहिजेत थोडक्यात हिम्मत बाळगली पाहिजे.
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.
वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.
वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..