तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
गोष्ट लहान वा मोठी कशा पद्धतीची जरी असली तरी आपण किती आत्मियतेने त्या गोष्टीला निभावतो हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे अहंकार न येऊ देता, सर्व बाबतीत "विनम्र राहणं" फार जिकारीचं व यशस्वी बनून राहण्याचं एकमात्र टॉनिक असतं.
अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.
तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
गोष्ट लहान वा मोठी कशा पद्धतीची जरी असली तरी आपण किती आत्मियतेने त्या गोष्टीला निभावतो हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे अहंकार न येऊ देता, सर्व बाबतीत "विनम्र राहणं" फार जिकारीचं व यशस्वी बनून राहण्याचं एकमात्र टॉनिक असतं.
अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.
आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.
मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.