तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.
कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.
आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.
चारही दिशांना अंधार दाटू लागल्याच जाणवत असेल, पुर्णत: हतबलता येत चालली असेल, तुम्ही खचत चालला असालं तर अशावेळी शक्यतो अवांतर वाचनाचा सहारा स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आवर्जून घ्या. अथवा पुर्णत: स्वत:च्या योजनांना तात्पुरता आराम द्या. निश्चिंत व्हा, "जियेंगे तो ओर भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे विश्रांतीच्या काळात असं बलाढ्य मन तयार करा की पुढील घौडदौड चांगली प्रभावी झाली पाहिजे.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.
तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.
कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.
आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.
चारही दिशांना अंधार दाटू लागल्याच जाणवत असेल, पुर्णत: हतबलता येत चालली असेल, तुम्ही खचत चालला असालं तर अशावेळी शक्यतो अवांतर वाचनाचा सहारा स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आवर्जून घ्या. अथवा पुर्णत: स्वत:च्या योजनांना तात्पुरता आराम द्या. निश्चिंत व्हा, "जियेंगे तो ओर भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे विश्रांतीच्या काळात असं बलाढ्य मन तयार करा की पुढील घौडदौड चांगली प्रभावी झाली पाहिजे.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.