पुर्वाग्रह अर्थात एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण केलेला ठराविक दृष्टीकोन, तर मुद्दा असा की पुर्वाग्रह बांधणं व त्यावरून पुढील निर्णय निर्माण करतं हे गणित थोडसं चुकीचं आहे. तुम्ही अनेकदा स्वत:च्या क्षमता, जिद्द, प्रयत्न, काल्पनिकता न वापरता इतरांच्या तुमच्याबद्दल झालेल्या प्रतिमेला खरं समजून स्वत:च्या यशात खोडा मारून घेत असता. अनेकदा असे पुर्वाग्रह समोरच्याबद्दल लावूनही तुम्ही नाती, आपुलकी गमावून इतरांना गृहीत धरू लागता.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
प्रत्येकाचा एक असा मित्र असतो जो आपल्याला वाक्यावाक्याला नकारार्थी बोलून, चुकून का असेना पण खच्चीकरण करत असतो. तर अशांच्या बोलण्याला फार महत्व न देता एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून बिनधास्त आपल्या योजनांवर ठामपणे लक्ष देऊन चालायचं.
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.
जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
पुर्वाग्रह अर्थात एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण केलेला ठराविक दृष्टीकोन, तर मुद्दा असा की पुर्वाग्रह बांधणं व त्यावरून पुढील निर्णय निर्माण करतं हे गणित थोडसं चुकीचं आहे. तुम्ही अनेकदा स्वत:च्या क्षमता, जिद्द, प्रयत्न, काल्पनिकता न वापरता इतरांच्या तुमच्याबद्दल झालेल्या प्रतिमेला खरं समजून स्वत:च्या यशात खोडा मारून घेत असता. अनेकदा असे पुर्वाग्रह समोरच्याबद्दल लावूनही तुम्ही नाती, आपुलकी गमावून इतरांना गृहीत धरू लागता.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
प्रत्येकाचा एक असा मित्र असतो जो आपल्याला वाक्यावाक्याला नकारार्थी बोलून, चुकून का असेना पण खच्चीकरण करत असतो. तर अशांच्या बोलण्याला फार महत्व न देता एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून बिनधास्त आपल्या योजनांवर ठामपणे लक्ष देऊन चालायचं.
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.
जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.