अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.
संघर्ष सुरू असतानाच्या काळात एखादी दैनंदिनी लिहित असालं तर त्यात रोज खचल्यावर इतकं स्वत:ला सांगत चला की, ही वेळ वाईट असली तरी तुम्ही धैर्यवान आहात. किंवा दैनंदिनी लिहत नसाल तरी एखाद्या रोजच्या अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून स्वत:ला ठामपणे बजावत चला.
अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.
आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.
संघर्ष सुरू असतानाच्या काळात एखादी दैनंदिनी लिहित असालं तर त्यात रोज खचल्यावर इतकं स्वत:ला सांगत चला की, ही वेळ वाईट असली तरी तुम्ही धैर्यवान आहात. किंवा दैनंदिनी लिहत नसाल तरी एखाद्या रोजच्या अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून स्वत:ला ठामपणे बजावत चला.