तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.
तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.