“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.
काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.
“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.
काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.