विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.
ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
न घडलेल्या गोष्टी किंवा काही अनोखे प्रकल्प, अनोख्या युक्त्यांची अंमलबजावणी, अनोखे कार्य करण्यासाठी जो तोडगा आपण शोधू शकत असू. तो तोडगा उत्तम असेल यावर विश्वास ठेवून निसंकोचपणे पुढची वाट चालत रहा. संकोच मनातल्या योजनांना नष्ट करतो पण काहीतरी करण्यात साध्य झालेल्या चुका व त्यातली शिकवण या गोष्टी यशाच्या जवळील मार्ग खुला करत असतात.
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.
ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
न घडलेल्या गोष्टी किंवा काही अनोखे प्रकल्प, अनोख्या युक्त्यांची अंमलबजावणी, अनोखे कार्य करण्यासाठी जो तोडगा आपण शोधू शकत असू. तो तोडगा उत्तम असेल यावर विश्वास ठेवून निसंकोचपणे पुढची वाट चालत रहा. संकोच मनातल्या योजनांना नष्ट करतो पण काहीतरी करण्यात साध्य झालेल्या चुका व त्यातली शिकवण या गोष्टी यशाच्या जवळील मार्ग खुला करत असतात.
तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.
तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.