जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.
जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.
जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.