एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.
नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.
तुम्ही एखाद्या विचारात अडकून राहू नका, एखाद्या नात्यात अडकून राहू नका, एखाद्या दिशेत स्वत:ला उगाच साचेबद्ध करून ठेवू नका. मलाच "अमुकतमुक इतकंच येत", माझ्याच्याने अमुकतमुक सवय सुटणार नाही, मी अमुकतमुक गोष्टीच करत असतो; ही अशी काही किचकट लेबल्स लावून अन स्वत:च्या व्यक्तीमत्वाला संपवणाऱ्या नात्यात जर अडकून राहिलो तर आपला स्वभाव नैराश्यात गुरफट जातो. त्यामुळे या गोष्टी प्रामुख्याने शक्यतो टाळा.
एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.
नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.
तुम्ही एखाद्या विचारात अडकून राहू नका, एखाद्या नात्यात अडकून राहू नका, एखाद्या दिशेत स्वत:ला उगाच साचेबद्ध करून ठेवू नका. मलाच "अमुकतमुक इतकंच येत", माझ्याच्याने अमुकतमुक सवय सुटणार नाही, मी अमुकतमुक गोष्टीच करत असतो; ही अशी काही किचकट लेबल्स लावून अन स्वत:च्या व्यक्तीमत्वाला संपवणाऱ्या नात्यात जर अडकून राहिलो तर आपला स्वभाव नैराश्यात गुरफट जातो. त्यामुळे या गोष्टी प्रामुख्याने शक्यतो टाळा.