कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते

Share:

More Like This

मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.

अंशुलिखित

प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.

किरण पवार

सहसा अनेकदा आपण अकारण इतरांच्या प्रगतीशी स्वत:च्या वयासोबत तुलना करत राहतो, त्याने अमुकतमुक वयात हे केलं ते केलं, हे मिळवलं वगैरे वगैरे... परंतु कायम ध्यानात ठेवा की ज्याने ज्या वयात जे मिळवलं आहे, त्यासाठी त्याच्या आजुबाजुला गोष्टी व परिस्थिती तशी व तेवढी पुरेशी होती. किंबहुना जरी नसली तरी काहीतरी असं असेल जे आपल्या परिसरात नाही वा आपल्यात कदाचित नाही. परिस्थिती यशाला सामोरं जाण्याआधी तुम्हाला सर्वांगाने सशक्त बनवत असते, त्यामुळे स्वत:वर विश्वास बाळगत व इतर गोष्टींचा मुळ दृष्टीकोन यांचा आढावा घेत चला.

अंशुलिखित

अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.

किरण पवार (अंशु)

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.

किरण पवार (अंशु)

मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.

अंशुलिखित

प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.

किरण पवार

सहसा अनेकदा आपण अकारण इतरांच्या प्रगतीशी स्वत:च्या वयासोबत तुलना करत राहतो, त्याने अमुकतमुक वयात हे केलं ते केलं, हे मिळवलं वगैरे वगैरे... परंतु कायम ध्यानात ठेवा की ज्याने ज्या वयात जे मिळवलं आहे, त्यासाठी त्याच्या आजुबाजुला गोष्टी व परिस्थिती तशी व तेवढी पुरेशी होती. किंबहुना जरी नसली तरी काहीतरी असं असेल जे आपल्या परिसरात नाही वा आपल्यात कदाचित नाही. परिस्थिती यशाला सामोरं जाण्याआधी तुम्हाला सर्वांगाने सशक्त बनवत असते, त्यामुळे स्वत:वर विश्वास बाळगत व इतर गोष्टींचा मुळ दृष्टीकोन यांचा आढावा घेत चला.

अंशुलिखित

अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.

किरण पवार (अंशु)

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.

किरण पवार (अंशु)