बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!
नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.
दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!
नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.
दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.