तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.
जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.
तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो; माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात तो कधीतरी चुकून एखाद्याचा तिरस्कार करू शकतो पण मग या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.
जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.
जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.
तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो; माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात तो कधीतरी चुकून एखाद्याचा तिरस्कार करू शकतो पण मग या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.
जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.