कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.
कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.