तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.
तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.