आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.
आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.
आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.
आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.