अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
हे अमुकतमुक असचं आहे किंवा आपल्यासारख्यांसोबत असचं होत राहतं वगैरे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा नकळतपणे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर तुम्ही बंधन आणत असता. ही बंधन नकळतपणे रूजत गेली तर नंतर तुम्ही सारंकाही पुर्वग्रह लावत स्वत:ला बंदिस्त करून जगता व चुकीच्या मार्गात अडकत जाता, त्यामुळे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवत कायम स्वत:ला नव्या पैलूंच्या शोधात ठेवत चला व स्वत:च्या ईच्छाशक्तीवर बंधणं लावू नका.
जिवण उत्कट आहे आणि ध्येयाकडे जायच्या वाटाही अगणित आहेत. त्यामुळे कधी एखादा ठरवलेला मार्ग काही कारणास्तव बंद झालाच तर निरास होऊन त्याची पाटी गिरवत बसण्यात अर्थ राहत नाही. नाउमेद माणसाकडून त्याच्यातली बरीच क्षमता काढून घेते, त्यामुळे संयम बाळगत नव्या दृष्टीकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे.
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.
मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.
हे अमुकतमुक असचं आहे किंवा आपल्यासारख्यांसोबत असचं होत राहतं वगैरे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा नकळतपणे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर तुम्ही बंधन आणत असता. ही बंधन नकळतपणे रूजत गेली तर नंतर तुम्ही सारंकाही पुर्वग्रह लावत स्वत:ला बंदिस्त करून जगता व चुकीच्या मार्गात अडकत जाता, त्यामुळे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवत कायम स्वत:ला नव्या पैलूंच्या शोधात ठेवत चला व स्वत:च्या ईच्छाशक्तीवर बंधणं लावू नका.
जिवण उत्कट आहे आणि ध्येयाकडे जायच्या वाटाही अगणित आहेत. त्यामुळे कधी एखादा ठरवलेला मार्ग काही कारणास्तव बंद झालाच तर निरास होऊन त्याची पाटी गिरवत बसण्यात अर्थ राहत नाही. नाउमेद माणसाकडून त्याच्यातली बरीच क्षमता काढून घेते, त्यामुळे संयम बाळगत नव्या दृष्टीकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे.
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.