तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
चारही दिशांना अंधार दाटू लागल्याच जाणवत असेल, पुर्णत: हतबलता येत चालली असेल, तुम्ही खचत चालला असालं तर अशावेळी शक्यतो अवांतर वाचनाचा सहारा स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आवर्जून घ्या. अथवा पुर्णत: स्वत:च्या योजनांना तात्पुरता आराम द्या. निश्चिंत व्हा, "जियेंगे तो ओर भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे विश्रांतीच्या काळात असं बलाढ्य मन तयार करा की पुढील घौडदौड चांगली प्रभावी झाली पाहिजे.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.
कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.
मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.
तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
चारही दिशांना अंधार दाटू लागल्याच जाणवत असेल, पुर्णत: हतबलता येत चालली असेल, तुम्ही खचत चालला असालं तर अशावेळी शक्यतो अवांतर वाचनाचा सहारा स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आवर्जून घ्या. अथवा पुर्णत: स्वत:च्या योजनांना तात्पुरता आराम द्या. निश्चिंत व्हा, "जियेंगे तो ओर भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे विश्रांतीच्या काळात असं बलाढ्य मन तयार करा की पुढील घौडदौड चांगली प्रभावी झाली पाहिजे.
व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.
कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.
मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.