तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.
तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.
हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.
तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.
तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.
हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.