182 Sad Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही, शेवटी ते परकेच ठरतात.
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही, एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.
ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.
मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोड़ीदार समजून बसलो, तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..
किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.
छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.
कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.