2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
अगदीच वाईट वेळ आलेली असेल किंवा संकट फारच मोठ आणि विचारांमधे फारच गोंधळ निर्माण होऊ लागला असेल तेव्हा थोडा स्वत:साठी काही वेळ शांत आणि संयमाचा बाजूला काढा, जेणेकरून त्या वेळेतून तुम्ही तोंडावरील संकटाला टप्प्याटप्याने कसं बाजूला करता येईल याची योजना आखू शकता.
घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.
तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.
एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
माणुस नैराश्यात जेव्हा जातो किंवा त्याचा एखादा नकारात्मक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो; तेव्हा त्याला हे असं ते अमुक तसं वगैरे सल्ले देण कटाक्षाने टाळा. कारण त्यालाही प्रसंगावधान राखून पुढील योजनांचा अंदाज असतोच फक्त इतकचं त्याला त्याच्या आत धगधगू लागलेली भावनांची आग त्याला कुठेतरी शमवायची असते, म्हणून तो तुम्हाला सांगू इच्छित असतो.
परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.
तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
प्रत्येकाला सहसा आपल्या स्वभावाला स्थैर्य देता यायला पाहिजे; जेव्हा तुमचे विचार सक्षम, प्रगल्भ आणि विस्तृत राहतात तेव्हा हे स्थैर्य लाभते. आणि स्थैर्यशील गोष्टी अडचणीत योग्य निर्णय घ्यायला मदत करतात.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.
कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.